मुख्य सामग्रीवर वगळा

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...

बुद्धधर्मात पौर्णिमेचे महत्व ,"ज्येष्ठ पौर्णिमा"

बुद्धगयेपासून सुमारे दोन मैलावर निरंजना नदी वाहते, एलतिरावर  गया तर पैलतीरावर पूर्वेला उरुवेला नामक एक अतिशय सुंदर गाव आहे, त्याच्या छायेतच सेनानी नावाचे छोटेसे खेडे वसलेल्या आहे, या ठिकाणी सेनानी नावाचा एक प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्ति राहत असे तिच्या नावावरूनच या गावास सेनानी नाव पडले ,त्याच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्याला ग्वालराज म्हणत.. सेनानीच्या विवाहाच्या काही वर्षानंतर त्याच्या कुटुंबात कन्या जन्मस आलि तिचे नाव "सुजाता" होते.                         त्या गावी   असलेल्या वटवृक्षाची अशी ख्याती होती की, जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांचीत फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ,एके दिवशी श्रद्धावान सुजातानेही वटवृक्षरुपि या              वृक्षराजाची पूजा करून इच्छा प्रगट केली की, जर मला सुंदर -सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि त्याच्यासोबत पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्रप्राप्ती होईल तर मी निर्जल दुधाची "मधुपायस" चढून पूजा करेल. हीच तिची इच्छा पूर्ती झाली म्हणून एका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या पात्रात खीर घेऊन ती वटवृक्षाखाली गेली. पाहते तर काय तेथे बोधीसत्व ध्यानस्थ बसलेले ,अनेक दिवसांपासून अन्नग्रहण न केल्यामुळे अस्थिपंजर झालेले ,ही वनदेवताच माझे नैवद्द स्वीकारण्यास अवतरली आहे असे सुजाताच वाटले. तिने वनदेवतेस विनवले की, कृपया करून माझे नैवद्द स्वीकारावे ,तपश्चर्येस ध्यानस्थ बसलेले बोधिसत्व म्हणाले भद्रे! मी वनदेवता नसून एक सामान्य मानव आहे. सत्याचा साक्षात्कार करून दुःख मुक्तीचा मार्ग शोधत आहे; "सत्याचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे".असे अभिवचन बोधिसत्त्वा कडून घेऊन खीरीचे स्वर्ण पात्र मनोभावे त्यांना अर्पण करून सुजाताने सिद्धार्थ वंदन केले व परत गेली.. या "खीर" दाणा नंतर गौतम सिद्धार्थाने निरंजना नदीवर जाऊन स्नान केले अनेक दिवसाच्या उपासानंतर त्या खिरीचे एकूण  ऐकोपन्नास ग्रासात सेवन केले ..उपासतापास व्रतवैकल्ये व क्केशाने शरीर क्षय करून सत्य सापडत नाही अशी, त्यांची खात्री झाली. आणि नव्याने  त्यांनी दुःख निवारण व साक्षात्काराच्या शोधार्थ प्रयास आरंभ केला ..   पुढे  जेव्हा बोधिसत्वास गया येथे बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांना सुजाता दिलेल्या  वचनाची आठवण झाली व त्या वचन पुर्तीसाठी त्यांनी परत सुजाताचा शोध घेऊन तिला तिच्या पतीस व पुत्र यश यास धम्मदीक्षा दिली.    सुजाताचा विवाह वाराणसीत झाला होता वाराणसीचे हे एकमेव कुटुंब होते की, ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार दीक्षा ग्रहण केली. सुजाता ही एक अशी महिला होऊन गेली की, तिच्या संबंधात सम्यक संबुद्धानी स्वतः म्हटले की, माझ्या उपासिका मध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे ,सहपरिवार सुजाताला दीक्षित केलेला तो दिवस म्हणजेच "ज्येष्ठ पौर्णिमेचा"होता.

 धम्माचा "दायक" बनण्याच्या इच्छेपोटी महाराज अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बोलावून विचारले काय आपण दोघेही "प्रवज्जा" ग्रहण कराल?मुलांनी उत्तर दिले ,देव!जर आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवजीत होऊ "प्रवज्जा" ग्रहण करण्याने आमचे व आपले कल्याण होईल असे आम्हाला वाटते, या कुशाग्रवादी व बलवान मनाने स्वामी असलेल्या बालकांचा दीक्षाविधी अतिशय समारंभपूर्वक व धुमधडाक्यात पार पडला .सम्राट कन्या संगमित्रा व पुत्र  महेंद्र धन्य होत, त्यांनी केवळ आपल्या पित्याच्या इच्छे खातिर गृहस्थ जीवनाचा त्याग करून "प्रवज्जा" घेतली जेव्हा महामिती महेंद्रस प्रवर्तित होऊन बारा वर्षे पूर्ण कालावधी झाला होता 'तेव्हा उपाध्यायने आणि संघाने मनोरम लंका द्वीपमध्ये जाऊन बुद्धधम्माच्या स्थापनेची आज्ञा केली, ती शिरसावंद्य मानून महेंद्राने उपाध्याय आणि संघास वंदन करून चार स्तवीर सोबत घेऊन बौद्ध धम्माच्या स्थापना, प्रचार आणि प्रचारासाठी लंकाद्वीप  गाठले  तो दिवस "जेष्ठ पौर्णिमेचा" होता!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तथागताच्या जीवनात आषाढीपौर्णिमेस घडलेल्या महत्त्वाच्या घटना"

आषाढी पौर्णिमा :-  शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना .                           पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न"  आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग  उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्...

"तथागत बुद्धांच्या जीवनात श्रावण पौर्णिमेचे महत्व"

  #अंगुलीमालाची दीक्षा श्रावण पौर्णिमा इ .स पु .,५०४ १)सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना , एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर  होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न के...

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...