मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...

#"जो स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता"!!

#मारावर विजय परिव्राजक सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या तयारीत आहेत , हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम खुप दृढनिश्चयी दिसतो , हा माझा अपमान करुन माझ्यापासुन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे , मला याचे वेळीच दमन करायला हवे , नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी आपलीसेनातयारकेली.अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार गिरीमेखल नावाच्या हत्तीवर आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. आपल्या शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि, आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे , त्याला त्याच्या सेनेचा पराभव दिसत होता , तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ उत...

"तथागत बुद्धांच्या जीवनात श्रावण पौर्णिमेचे महत्व"

  #अंगुलीमालाची दीक्षा श्रावण पौर्णिमा इ .स पु .,५०४ १)सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना , एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर  होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न के...

Vipassana...

  #विपस्सना    रूप भिक्खवे अनिच्चं ... वेदना अनिच्चा...सञ्ञा अनिच्चा... संखारा अनिच्चा...विञ्ञाणं अनिच्चं । यदनिच्चं तं दुक्खं , यं दुक्खं तदनत्ता , यदनत्ता तं नेतं मम , नेसो हमस्मि , न मेसो अत्ता ति ॥   एहवमेतं यथाभूतं सुभ्मप्पञ्ञाय दट्ठव्बं ॥ भिक्षुहो , रूप अनित्य आहे... वेदना अनित्य आहेत... संज्ञा अनित्य आहे... सस्कार अनित्य आहे... विज्ञान अनित्य आहे. जे अनित्य ते दुःखकर , जे दुःखकर ते अनात्मक , जे अनात्मक ते माझे नव्हे. तो मी नव्हे , तो माझा आत्मा नव्हे.   याप्रमाणे हे यथार्थतया सम्यक प्रज्ञेने पहावे. या विधानाप्रमाणे रूप , वेदना , संज्ञा , संस्कार आणि विज्ञान या पाच स्कंधांवर अनित्यतेची भावना करावयाची आहे , धरणीकंपादिकाच्यायोगाने पृथ्वीच्या स्थिर भागातहि भयंकर अदलाबदल होत असते. नद्यांचे जेथे स्त्रोत असेल तेथे वाळवंट  बनते व नदीचा प्रवाह भलत्याच बाजूला वहात असतो पण असे विलक्षण फेरफार सर्वांनाच पहावयास मिळत नसतात. त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर उगवणार्‍या आणि ज्यात पृथ्वीचाच अंश जास्त आहे , अशा- वनस्पतिवर्गाचे निरीक्षण करावे.   पाव...

#आनापानस्मृतिभावना

  “ आनापानस्मृतिभावना ” मज्झिमनिकायांत आनापानसति नावाचे एक स्वतंत्र सुत्त आहे.   संयुत्तनिकायात आनापानसंयुत्त  नावाचे एक मोठे प्रकरण आहे , आणि इतर निकायांतूनही या आनापानस्मृतीचा अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे.   त्या सर्वांवरून बुद्धसमकाली आणि त्यानंतर काही काळपर्यंत हे कर्मस्थानप्रधानभूत गणले जात होते यात शंका नाही. म्हणून याच कर्मस्थानाचा येथे प्रथमतः विचार करण्यात येत मज्झिमनिकाय , महासकुलवायिसुत्त , आणि अंगुत्तरनिकाथ , एककनिपात व दसकनिपात यांत यांचा उल्लेख आढळतो.   “ आन म्हणजे आश्वास व अपमान म्हणजे प्रश्वास ह्यांच्या स्मृतीला आनापानस्मृति म्हणतात ” .   आनापानसतिसुत्तांत   बुद्ध भगवान् म्हणतो , '' भिक्षुहो , एखादा भिक्षु अरण्यात , झाडाखाली किंवा एकांतस्थळी जाऊन देह सरळ ठेवून मोठ्या सावधगिरीने बसतो.   तो सावधानपणे आश्वास घेतो वसावधानपणे प्रश्वास सोडतो.   दीर्घ आश्वास घेत आहे असे जाणतो ; दीर्घ प्रश्वास सोडीत  असला तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो ; र्‍हस्व आश्वास घेत असला तर र्‍हस्व आश्वास घेत आहे असे जाणतो ...

।समाधी मार्ग।

  विपस्सना “ समाधी मार्ग ” विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली  ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना या नावाने ही ध्यानपद्धती जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धानी  सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.  पाली भाषेत "विपस्सना ' शब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. गौतम बुद्धानी  स्वतः  या ध्यानपद्धतीचा अभ्यास करून ; तिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे  आहे. गौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही ध्यान पद्धती आचरली गेली , समाधिमार्ग फार प्राचीन आहे.   आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते , व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.   लहानपणी बोधिसत्त्व कालामाच्या आश्रमात जाऊन समाधीचा अभ्यास करीत  असत .   हा ...