मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...

#अष्टांगिक मार्ग ASTANGIK MARG

  बुद्धांनी,Tathagat Buddha-    सारनाथ   येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘ अष्टांग मार्ग ’ किंवा ‘ मध्यम मार्ग ’ सांगितला. अष्टांगिक मार्ग ASTANGIK MARG BY TATHAGAT BUDDHA .. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या अंगीकारल्यास मानवाचे जीवन सुखमय होते.(Aary Astamgik marg ) १) सम्यक् दृष्टी   :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. २) सम्यक् संकल्प   :- म्हणजे योग्य निर्धार , विचार. ३) सम्यक् वाचा   :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे. ४) सम्यक् कर्मान्त   :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे. ५) सम्यक् आजीविका   :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. ६) सम्यक् व्यायाम   :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. ७) सम्यक् स्मृती   :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मना...

“विनयधर भिक्षुणीश्राविकांत पटाचारा श्रेष्ठ आहे.

“ विनयधर भिक्षुणीश्राविकांत पटाचारा श्रेष्ठ आहे. ” पटाचारा ह्यांचा  जन्म श्रावस्ती येथें एका सावकाराच्या कुटुंबांत झाला  ,वयांत आल्यावर आपल्या  वडिलांच्या एका नोकरावर तिचें मन जडलें. अर्थातच ही गोष्ट घरांत कोणास माहीत नव्हती. पुढें समानजातीच्या तरुणाबरोबर तिचें लग्न ठरलें असतां ह्या नोकराला बरोबर घेऊन , व बरोबर नेण्याजोगे दागदागिने घेऊन ती घरांतून निघून  गेली. तीं दोघे श्रावस्तीहून तीन चार योजनांच्या अंतरावर एका खेडेगांवीं जाऊन राहिलीं. कांहीं काळानें ती गरोदर झाली , व नवमास पूर्ण झाल्यावर आपल्या वडीलांच्या  घरीं जाण्यास सिद्ध झाली. नवर्‍याला ही गोष्ट इष्ट नव्हती. म्हणून तो आजउद्यां करीत राहिला. शेवटीं ती एकटीच निघाली. नवर्‍यानें मागोमाग येऊन तिला गांठलें. वाटेंतच तिला मुलगा झाल्यामुळें श्रावस्तीला जाण्याचा बेत रहित करून तीं आपल्या राहत्या गांवीं आलीं. पुन्हां कांहीं वर्षांनीं ती गरोदर झाली , व नवमास पूर्ण झाल्यावर नवरा टंगळमंगळ करीत असतां एकटीच श्रावस्तीला जाण्यास निघाली. एका निर्जन प्रदेशांत तिला नवर्‍यानें गांठलें. तेथेंच तिला प्रसवनेदना होऊं लागल्या. इतक्य...

बुद्धाचे संदेशवाहक राष्ट्रपाल धम्मधूत

  “ श्रद्धेनें प्रव्रज्या घेतलेल्या भिक्षुश्रावकांत राष्ट्रपाल श्रेष्ठ आहे ” .                 भगवान् बुद्ध कुरुराष्ट्रांत प्रवास करीत मोठ्या भिक्षुसंघासह थुल्लकोद्वित नांवाच्या कुरूंच्या शहरापाशीं आले , तेथील ब्राह्मणांनीं त्यांची कीर्ति ऐकून ते सर्व त्यांच्या  दर्शनाला गेले. कोणी त्यानां नमस्कार करून , कोणी कुशल प्रश्न विचारून , कोणी अंजलि करून , कोणी आपलें नामगोत्र सांगून व कोणी मुकाट्यानेंच जाऊन एका बाजूला बसले. त्या ब्राह्मणांना भगवंतानें जेव्हां धर्मोपदेश केला तेव्हां राष्ट्रापालहि तेथें होता. त्याच्या मनावर एकदम परिणाम झाला , व प्रव्रज्या घेण्याचा आपला विचार त्यानें भगवंताना  कळविला. पण त्याच्या आईबापांची परवानगी नसल्यामुळें त्याला प्रव्रज्या देण्याचें भगवंतानी  नाकारलें. तेव्हां घरीं जाऊन प्रव्रज्या घेण्यास परवानगीं देण्याविषयीं आपल्या आईबापांशीं तो हट्ट धरून बसला. त्यांनीं त्याची पुष्कळ प्रकारें समजूत घातली , व आपण जिवंत असतां त्याला परवानगी देतां येणें शक्य नाहीं असें सांगितलें. ‘ ए...