#मारावर विजय
परिव्राजक सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या तयारीत आहेत, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत
कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम
खुप दृढनिश्चयी दिसतो, हा माझा अपमान करुन माझ्यापासुन
स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे, मला याचे वेळीच दमन
करायला हवे, नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व
माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी
आपलीसेनातयारकेली.अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार गिरीमेखल नावाच्या
हत्तीवर आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने
बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. आपल्या
शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची
फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे
बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि,
आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे, त्याला त्याच्या
सेनेचा पराभव दिसत होता, तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ
उत्पन्न केले. आसपासचे वृक्ष कोसळु लागले, पशूपक्ष्यांचा एकच
आक्रोश सुरु झाला. परंतु बोधीसत्व आपल्या समाधीपासुन तीळ मात्रही ढळले नाही.
तेव्हा बोधीसत्वाला पाण्याने बुडवुन मारीन
म्हणुन त्यान पाऊस पाडला, जिकडे
तिकडे महापुर आणलापरंतुपाण्याचाएकहीथेंबबोधीसत्वालास्पर्शकेलानाही.
त्यामुळे व्यथीत झालेल्या माराने सहा
प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे पाहुन
मार अतिशय खिन्न झाला. तरीसुद्धा त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याने भयानक
काळोख उत्पन्न केला, ती
वैशाख शुद्ध पोर्णीमेची रात्र होती. पोर्णीमेच्या चंद्राने आणि चांदण्याने रात्र
खुप प्रकाशलेली होती. परंतु माराने बोधीवृक्षाजवळ भयानक अंधकार पसरविल्या कारणाने,
माराचा गिरीमेखल हत्ती व जवळपासची पर्वतशिखरे घुबडांना दिसेनाशी
झाली. परंतु बोधीसत्वाच्या प्रज्ञारुपी प्रदीपा पुढे माराचा अज्ञान रुपी अंधकारचा
नायनाट केला.
आजपर्यंत त्या माराला पराभव काय आहे, हे माहीतच नव्हते, आजपर्यंत त्याचा कधीच पराभव झाला नव्हता. जरी एखाद्या श्रमणाने किंवा
ब्राह्मणाने माराविरुद्ध युद्ध पुकारले तरी मार आपल्या एखाद्या तुकडीला पाठवुन
त्याचा तेव्हाच पराभव करायचा.
श्रमण गौतम साधारण तपस्वी नव्हते हे
जाणुनच माराने आपल्या सैन्याला त्याच्यावर तुटुन पडायच्या आज्ञा केल्या होत्या, परंतु आपल्या अफाट सेनेला बोधीसत्व चारी
मुंड्या चित करल हे त्या जाणले नव्हते. आपली सर्व शक्ती पणाला लावुन देखील तो
बोधीसत्वाला आपल्या मार्गापासुन क्षणभरही विचलीत करु शकला नव्हता, आता परभवाची वार्ता घेऊन माघारी जाण्यापेक्षा बोधीसत्वावर हल्ला करणे
माराला योग्य वाटले. तेव्हा मार आपल्या गिरीमेखल हत्तीवरुन खाली उतरला आणि
बोधीसत्वाला म्हणाला सिद्धार्था इथुन मुकाट्याने चालता हो, नाहीतर
एका क्षणात तुझा नाश करेन.
तेव्हा बोधीसत्व म्हणतो, हे पापी मारा, तुझ्या
सैन्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो, वेगवेगळ्या प्रकारच्या
चैनीच्या वस्तु ही तुझी सर्वात पुढे
जाणारी तुकडी आहे. तहान, भुक, तृष्णा,
आळस, गर्व, किर्तीची आशा,
आत्मस्तुती आदी, ह्या तुकड्या त्यामागोमाग येत
असतात. कच्च्या मातीचे भांडे जसे फोडतात त्याप्रमाणे मी तुझ्या सैन्याचा पराभव
करेन.हे ऐकुन मार म्हणाला, त्या सर्व गोष्टींना जाऊदे,,
आधी तु ज्या आसनावर बसला आहेस, तिथुन उठ ते
माझे आसन आहे. चल ताबडतोब चालता हो इथुन. त्यावर बोधीसत्व म्हणाले , कशावरुन तु म्हणत आहेस की , हे तुझे आसन आहे, याचा
तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? हा प्रश्न ऐकुन माराच्या
सेनेतील अनेक लोक योध्ये म्हणायला आहोत की आम्ही साक्षी आहोत. तेव्हा पापी मार बोधीसत्वाला
म्हणाला की , सिद्धार्था हा माझा पुरावा आहे, चल आता इथुन मुकाट्याने चालता हो. त्यावर बोधीसत्व म्हणाला की मी अनेक जन्मी दानपारमिता पुर्ण करुन या आसनावर
बसण्याचा अधिकारी बनलो आहे, यावर मार म्हणाला याचा तुझ्याकडे
काय पुरावा आहे. तेव्हा
बोधीसत्व म्हणाले ही पृथ्वी साक्षी आहे, ही वसुंधरा साक्षी आहे. याचबरोबर श्रमण
गौतमाने अनेक जन्म घेऊन दानपारमिता पुर्ण केली याबाबत साक्ष दिली. त्या
प्रवाहाबरोबरच आपल्य अफाट सेनेसह व गिरिमेखल हत्तीसोबत मार वाहुन गेला. माराची
झालेली दुर्दशा झाली बोधीवृक्षाजवळ जमले
आणि त्यांनी सिद्धार्थावर पुष्पवृष्टी केली. तेव्हा बोधीसत्वानी पुढील गाथा म्हटली,,
यो
सहस्सं सहस्सेन, सङ्गामे मानुसे जिने।
एकञ्च
जेय्यमत्तानं स वे सङ्गामजुत्तमो॥
जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या
जेत्याहुन), जो एक स्वतःला
जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय.सर्वश्रेष्ठ भगवंत ज्यांनी
स्वतःलाच जिंकले..
बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधंतं,
गिरिमेक्खलं उदित-घोर-ससेन मार!
दानादि धम्मविधिना जितवा मुनिंदो,
तं ते जसा भवतु ते जयमङलानि!!!
मंगल हो !!
टिप्पण्या