मुख्य सामग्रीवर वगळा

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...

#आनापानस्मृतिभावना

 आनापानस्मृतिभावना




मज्झिमनिकायांत आनापानसति नावाचे एक स्वतंत्र सुत्त आहे.  संयुत्तनिकायात आनापानसंयुत्त

 नावाचे एक मोठे प्रकरण आहे, आणि इतर निकायांतूनही या आनापानस्मृतीचा अनेक ठिकाणी

उल्लेख आला आहे.  त्या सर्वांवरून बुद्धसमकाली आणि त्यानंतर काही काळपर्यंत हे कर्मस्थानप्रधानभूत गणले जात होते यात शंका नाही. म्हणून याच कर्मस्थानाचा येथे प्रथमतः विचार करण्यात येत मज्झिमनिकाय, महासकुलवायिसुत्त , आणि अंगुत्तरनिकाथ, एककनिपात व दसकनिपात यांत यांचा उल्लेख आढळतो.
  आन म्हणजे आश्वास व अपमान म्हणजे प्रश्वास ह्यांच्या स्मृतीला आनापानस्मृति म्हणतात. 
आनापानसतिसुत्तांत   बुद्ध भगवान् म्हणतो, ''भिक्षुहो, एखादा भिक्षु अरण्यात, झाडाखाली किंवा एकांतस्थळी जाऊन देह सरळ ठेवून मोठ्या सावधगिरीने बसतो.
  तो सावधानपणे आश्वास घेतो वसावधानपणे प्रश्वास सोडतो.  दीर्घ आश्वास घेत आहे असे जाणतो; दीर्घ प्रश्वास सोडीत

 असला तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो; र्‍हस्व आश्वास घेत असला तर र्‍हस्व

आश्वास घेत आहे असे जाणतो; र्‍हस्व प्रश्वास सोडीत असला तर र्‍हस्व प्रश्वास सोडीत

आहे असे जाणतो; सर्व देहाची स्मृती ठेवून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास

 करतो; कायसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो. 

 प्रीतीचा अनुभव घेऊन आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो;

चित्तसंस्कार जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; चित्तसंस्कार शांत करून

 आश्वास प्रश्वासकरण्याचा अभ्यास करतो.चित्त जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो;

चित्ताला प्रमुदित करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; चित्ताचे समाधान करून

आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.  चित्तालां विमुक्त करून आश्वास प्रश्वास करण्याचा

अभ्यास करतो.  अनित्यता जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; वैराग्य जाणून

आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; निरोध जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा

अभ्यास करतो; त्याग जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.भिक्षुहो, याप्रमाणे

आनापानस्मृतीची भावना केली असता ती महत्फलदायक आणि महद्धितकारक होते.''


पहिल्या प्रथम सावधानपणे आश्वास घेणे व प्रश्वास सोडणे याचे विधान आहे.  आणि हेच काम

फार कठीण जाते.  श्वासोच्छवासांवर मन ठेवण्याचा प्रयत्‍न केल्याबरोबर ते इकडे तिकडे

धावावयास लागते.  त्याच्याबरोबरच अश्वासप्रश्वासांचेही अवलोकन करावयाचे असते. 

 अशा रीतीने ध्यानाला सुरुवात केलीअसता काही विपरीत पदार्थ डोळ्यांसमोर येऊ लागले,

तर योग्याचे चित्त अद्यापि रुग्णावस्थेत आहे, असे समजले जाते; व त्याच्या मनात वर सांगितलेल्या निवरणांपैकी

कोणत्या निवरणाचा प्रादुर्भाव आहे, हे विचारून घेऊन, त्याचा प्रतीकार कोणत्या भावनेने करावा,

हे सांगण्यात येते.

  अशा रीतीने चित्तदोषांचे दमन करून शांतपणे आणि निर्भयपणे अश्वासप्रश्वासांवर चित्त

 आणले असता डोळ्यांसमोर समाधीला साधक पदार्थ दिसू लागतात.  एखाद्याला रम्य

वनप्रदेश दिसतो, तर दुसर्‍याला एखादी उत्तम नदी वाहात आहे असा भास होतो. 

इतरांना कमळे सूर्यमंडल चंद्रमंडल किंवा असेच कामविकारविरहित रम्य देखावे दिसू लागतात. 

परंतु त्यात आसक्त न होता अश्वासप्रश्वासांवर ध्यान करण्याचा प्रयत्‍न त्याने तसाच चालू ठेवला पाहिजे. सावधानपणें अश्वास प्रश्वास कसे करता येतात याचे विवरण या सूत्रात ज्या

 चार चौकड्या आहेत त्यापैकी पहिल्या चौकडीत केले आहे. 

 त्यात दीर्घ अश्वास आणि दीर्घप्रश्वास म्हणजे लांब अश्वास व लांब प्रश्वास,

किंवा अधिक काळ टिकणारा आश्वास प्रश्वास;

 आणि र्‍हस्व अश्वास प्रश्वास म्हणजे कमी काळ टिकणारा आश्वास प्रश्वास.  अर्थात हे

 परस्पररावलंबी आहेत.  धावणार्‍या मनुष्याचे अश्वासप्रश्वास फार दीर्घ चालतात;

पण तोच जर उभा राहिला, तर ते हळू हळू र्‍हस्व होत जातात.  दमून येऊन उभा राहिलेल्या

माणसापेक्षा शांतपणे बसलेल्या माणसाचे अश्वासप्रश्वास र्‍हस्व असतात.  बहुधा ध्यानारंभी

अभ्यासप्रश्वास दीर्घ असतात, आणि मग हळूहळू र्‍हस्व होत जातात.  म्हणून प्रथमतः दीर्घ

आणि मग र्‍हस्व या विशेषणांचा उपयोग करण्यात आला आहे.  या आश्वासप्रश्वासांचे एकदा

 आकलन झाले, म्हणजे आपल्या सर्व देहाची स्मृती ठेवून अश्वासप्रश्वास करण्याचा अभ्यास

करावा लागतो. तो जर साध्य झाला, तर सर्व शरीरावर एक प्रकारच्या आनंदलहरी उठू लागतात,

त्यायोगे शरीर कंपित होते आहे असे वाटू लागते.  पण असे सुखकारक कार्यसंस्कारही प्रशांत करून अश्वास

 प्रश्वास करावयाचा असतो.

अनापानस्मृतिभावनेचा सर्वात मोठा फायदा हा की, तिचा अल्पाभ्यासहि हितकारक होत

असतो; तिच्यामुळे हानी होण्याचा मुळीच संभव नसतो.  पहिल्या चौकडीचा तेवढा अभ्यास

 पूर्ण  झाला असे जरी धरले, तरी त्याचा व्यवहारात वारंवार चांगला उपयोग होतो. 

ज्या ज्या वेळी आपले मन कामक्रोधादिक मनोवृत्तींनी बहकले जाते, भयाने किंवा कुशंकेने

व्यग्र होते, त्या त्या वेळी प्राणापानाचे आलंबन मिळाल्यामुळे ते एकदम ताळ्यावर येते. 

अंधार्‍या रात्री खाचखळग्यांतून जात असता जसा काठीचा आपणास उपयोग होतो, तसा

प्रपंचात चित्ताला या आलंबनाचा उपयोग होत असतो.  मेसिडोनियाच्या फिलिप बादशाहाने

 आपण बहकून जाऊ नये म्हणून आपणाला स्मरण देण्यासाठी एक मनुष्य ठेवला होता; व तो

 'फिलिप, तू मनुष्य आहेस, तू मनुष्य आहे, असे वारंवार म्हणत असे.  परंतु प्रत्येक माणसाला

 अशा रीतीने आपणाला स्मरण देण्यासाठी दुसरा मनुष्य ठेवता येणे शक्य नाही; आणि

आनापानस्मृतीची भावना केली असता त्याची गरजही नाही.  उच्छृंखल मनाला आवरण्याचे

काम आनापानस्मृति आपोआपच करीत असते.

 

!!मंगल हो !!

@बालस्नेही

 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तथागताच्या जीवनात आषाढीपौर्णिमेस घडलेल्या महत्त्वाच्या घटना"

आषाढी पौर्णिमा :-  शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना .                           पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न"  आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग  उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्...

"तथागत बुद्धांच्या जीवनात श्रावण पौर्णिमेचे महत्व"

  #अंगुलीमालाची दीक्षा श्रावण पौर्णिमा इ .स पु .,५०४ १)सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना , एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर  होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न के...

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...